अजून पुण्यात येऊन काही महिनेच होत आहेत आणि खर सांगू पुण्यात असण्याचा आणि पुणेकर म्हणवण्याचा अभिमान वाटायला लागला आहे. का कुणास ठाऊक पण एक समाधान वाटत. पण अजूनही कधी कधी विचार करायला बसले न तर विश्वास बसत नाही कि मी खरच पुण्यात आहे. खरच गेल्या वर्षापर्यंत जे पुण माझ्यासाठी एक स्वप्ना सारख होत त्याच पुण्यात मी राहते यावर विश्वास ठेवण कठीण जात. फार पूर्वीपासून मला पुण्यात येण्याची इच्छा होती. अगदी बारावी नंतर यायचं होत पण शक्य झाल नाही नंतर graduation ची तीन वर्ष काढली नाशकात आणि ठरवलं कि आता तरी पुण्यातच जायचं pg साठी.खर सांगते त्यावेळी university त शिकायला येण्याची खूप इच्छा होती. शिवाय मी पर्यायी पुण्यातल्या सगळ्या कॉलेजचे forms download करून ठेवले होते (त्यात माझ्या आताच्या कॉलेज चाही form होता.) . पुणे विद्यापीठात नंबर लागतहि होता पण काय करणार नशिबातच नव्हते. पण मी ठरवले आता नाही तर नाही पण दोन वर्षांनी phd करण्यासाठी तरी मी पुण्यातच जाणार काहीही झाले तरीही. पण नशीब बघा एक वर्ष आधीच मला इथे यायला मिळाल आणि तेही अक्षरश ढकलून ढकलून आणालय नशिबाने. पूर्वी माझा नशिबावर इतका विश्वास नव्हता पण गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांनी माझा खरच विश्वास बसला नशिबावर. घटना अगदी पूर्वी ठरवल्या सारख्या घडत गेल्या.
खर तर आमच्या साठी सोप नव्हत इतकी वर्ष एका शहरात राहिल्यावर तिथल सगळ सोडून एका अगदीच नव्या शहरात राहायला जाण. तेही सगळ बिर्हाड उचलून. आणि आम्ही कधी असा विचारही केला नव्हता कि आम्ही कधी अस करू. पण बाबांची बदली होण् (टाळूनही), माझ पुण्यात यायला तयार होण् आणि आम्ही येथे येण अगदी अशक्य वाटणार, पण ते झाल. मी तयार नव्हते कारण एक वर्ष तिकडे काढून मग इथे सगळ नव्याने करण मला कठीण वाटत होत. पण अस सगळ बदलत गेल कि आम्हाला इथे यावच लागल.
पण इथे येण्याआधी मला सगळ्यांनी घाबरवल होत कि तिथे जाते आहेस पण तुला जमणार आहे का, तिथले लोक म्हणजे पुणेकर लवकर accept करणार नाहीत, तू एकटी पडशील, friends मिळणार नाहीत, वगैरे वगैरे. मी पण जरा घाबरलेच होते पण मग ठरवले कि जाऊ देत. मी माझ काम करीन. कोणी नाही मिळाल सोबत तरी मी एकटी काढीन हे वर्ष कसही. पण नाही, खरच मी collg मध्ये गेल्यावर पहिल्याच दिवशी मला जाणवलं कि सगळे किती चुकीचे होते. इथल्या लोकांनी मला इतक्या लवकर आणि आपुलकीने accept केल कि मला जाणीवच होऊ दिली नाही कि मी इथे नवीन आहे म्हणून. त्यात मला नशिबाने collg पण इतक चांगल मिळाल. खरच सगळ नशिबानेच होत.
आज जरा मागे जाऊन सगळ्या गोष्टींचा विचार केला कि कळत कि जे होत ते चांगल्यासाठीच होत. मला पुण्यात येऊन जे काही मिळाल आहे ना ते इतक अमुल्य आहे कि ते मी कधीही विसरू शकणार नाही. मला मीच सापडले, उमगले. मला जगण म्हणजे काय ते कळाल. मी आयुष्य जगायला खऱ्या अर्थाने इथे सुरुवात केली. माझी स्वतःची ओळख निर्माण झाली. मी सुद्धा काहीतरी आहे हे माझ मलाच कळल. स्वतः ला सिध्द करण्याची हिम्मत आली. आयुष्य जगण्याची दिशा मिळाली. म्हणून आज पुण्यात असण्याच समाधान वाटत.